११ सैनिक ठार, ७८ जखमी   

पाकिस्तानच्या लष्कराचा दावा 

इस्लामाबाद : भारतासोबतच्या संघर्षात अधिकार्‍यांसह ११ सैनिक ठार तर ७८ जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने मंगळवारी केला आहे.पाकिस्तानच्या लष्कराने असेही सांगितले की, ४० नागरिक ठार झाले असून १२१ जखमी झाले आहेत. ६ आणि ७ मे रोजी भारतीय लष्कराने अचानक कारवाई केली. अत्यंत घातक हल्ला केला. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी ठिकाणे उडवली. यानंतर आम्ही ८, ९  आणि १० मे रोजी भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चार दिवस ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले एकमेकांवर केल्यानंतर शनिवारी शस्त्रसंधी केली. दरम्यानच्या काळात ११ सैनिक ठार झाले असून ७८ जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. मृतांमध्ये स्क्वाड्रन लीडर उस्मान  युसूफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, ज्येष्ठ तंत्रज्ञ नजिब, तंत्रज्ञ फारुक आणि मुबशीर मारले गेले. एका विमानाचे नुकसान झाले. 
 
त्याशिवाय नाईक अब्दुल रेहमान, लान्स नाईक दिलावर खान, इक्रमुल्लाह, वकार खलिद, शिपाई महम्मद अकबर, निसार यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या र्सैनिकांची भेट लष्करप्रमुख असिफ मुनीर, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी घेतली. 

Related Articles